‘योग’ हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचे एक अभिन्न अंग राहिले आहे. परंतु ह्या दीर्घ कालावधीमध्ये योगाचा विशाल अर्थ कुठेतरी हरवून गेला आहे. आज जगातल्या अधिकांश देशात आणि आपल्या देशातसुद्धा लोक ‘योग’ म्हणजे व्यायामाची एक पद्धती असे समजतात.
योगाचे समग्र स्वरूप समजावण्याच्या उद्देशाने स्वामीजींनी एक लेखमाला लिहिली. त्याच लेखांचे संकलन पुस्तिकेच्या रूपात प्रस्तुत केले आहे. ही पुस्तिका वाचकांचे केवळ ज्ञानवर्धनच करणार नाही तर त्यांना स्वत:ला जाणून घेण्यात आणि आत्मोन्नतीच्या मार्गावर अग्रेसर करण्यातदेखील महत्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आहे.