४५ दिवसांच्या गहन ध्यान अनुष्ठानाच्या दरम्यान पूज्य गुरुदेव ध्यानाच्या उच्च अवस्थेत असतात आणि सर्व साधकांचे सूक्ष्मपणे अवलोकन करत असतात. समाजात नेहमीच स्त्रियाबद्दल होत असलेल्या उपेक्षेची भावना लक्षात घेऊन स्त्रियांच्या सर्वांगीण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पूज्य स्वामीजींनी आपल्या २००९ च्या गहन ध्यान अनुष्ठानात स्त्रियांना आतून सबल करण्याच्या हेतूने स्त्रियांना ध्यानाच्या माध्यमातून अंतर्मुख होऊन आपल्या स्वत:ला ओळखण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्याच संदेशांचे संकलन ह्या पुस्तिकेद्वारे केले गेले आहे
पूज्य गुरुदेवांनी हे गहन ध्यान अनुष्ठान मातृशक्तीची आराधना ह्या अनुष्ठानाच्या रूपात घोषित केले आणि सर्व स्त्री-शक्तींना ह्या अनुष्ठानात सहभागी होण्याकरिता आवाहन केले. ह्या संदेशांच्या माध्यमातून अधिकाधिक स्त्रियांना मार्गदर्शन मिळून त्याचा लाभ ह्या स्त्रियांना मिळेल अशी आशा आहे.